दशकभराच्या शांततेनंतर श्रीलंकेत पुन्हा मोठा हिंसाचार - In India Live

Breaking News

22/04/2019

दशकभराच्या शांततेनंतर श्रीलंकेत पुन्हा मोठा हिंसाचार

संघर्ष गांगुर्डे, इन इंडिया लाईव
मुंबई,दि २१ श्रीलंकेची राजधानी असल्याच्या पार्श्वंभूमीवर झालेल्या या हल्ल्यांमुळे संपूर्ण जग हादरले  आहे. या हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने संध्याकाळी ६ पासून आज सकाळी ६ पर्यंत कोलंबोत संचारबंदी जारी केली. श्रीलंकेचे पंतप्रधान कोलंबो शहरात काल सकाळी ८;४५ पासून  दुपारी दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणच्या चर्च व चार पंचतारांकीत हॉटेल्समध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २९० जण ठार व ५०० हून अधिक नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये ३५ विदेशी नागरिक असून त्यात तीन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. जगभरात काल ईस्टर संडे साजरा होत रानील विक्रमे सिंगे यांनी भ्याड हल्ला अशा शब्दात या हल्यांचे वर्णन केले आहे. जगभरातील देशप्रमुखांनी या नृशंस हत्याकांडाचा निषेध केला आहे.

वृत्तसस्थांच्या माहितीनुसार सकाळी ८.४५ वा. या आत्मघाती बॉम्बस्फोटांना कोलंबोतील ४५, नेगोम्बे भागातील सेंट अँटनी चर्चमध्ये प्रारंभ झाला. तेथे ६७ भाविक मृत्यूमुखी पडले. तर बट्टिकलोआ येथे २५ जण ठार झाले. सर्वात प्रथम बॉम्बस्फोट सेंट अँटनी चर्चमध्ये, दुसरा सेंट सेबेस्तियन चर्चमध्ये, तिसरा बट्टिकालो आतील चर्चमध्ये झाला. तसेच दशांग्रिला, द सिनामॉन ग्रांद, द किंग्सबरी या पंचतारांकीत हॉटेल्समध्ये नंतर स्फोट झाले.

श्रीलंकेत एलटीएटीईबरोबरील हिंसक संघर्षानंतर गेल्या दशकभराच्या काळात शांततेचे वातावरण दिसत असतानाच काल हे हल्ले झाले होते. ईस्टर संडेदरम्यान कोलंबोतील चर्च तसेच पंचतारांकीत हॉटेल्समध्ये विदेशी नागरिकांचा वावर असल्याने ही ठिकाणे हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. सिनामॉन ग्रांद या हॉटेलच्या रेस्टॉरंटसमोर एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून लावले अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र सर्वच बॉम्बस्फोट हे आत्मघाती होते की काय याची पुष्टी मिळाली नाही असे सांगण्यात आले. नॅशनल हॉस्पिटलमध्ये ६६ मृतदेह ठेवण्यात आले असून १०४ मृतदेह नेगोम्बो हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. जखमी झालेल्या ३६० जणांवर इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.
श्रीलंकेचे विदेश सचिव रवीनाथ अरियासिंघे यांनी ३५ विदेशी या हल्ल्यांमध्ये ठार झाल्याचे सांगितले.
कोलंबो जिल्ह्यातील चर्चमधील सर्व प्रार्थना सभा रद्द करण्यात आल्याचे कार्डिनल माल्कम रंजित यांनी जाहीर केले आहे. दरम्यान श्रीलंकेतील भारतीय दुतावासाने आपण परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे.श्रीलंकेतील सर्व पोलीस कर्मचार्यांतच्या सुट्ट्या सरकारने रद्द केल्या आहेत. तसेच रजेवरील डॉक्टर्स, परिचारिका यांना तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment