प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, - दि,१४ -कोरोना विषाणूच्या होणाऱ्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत. दहावी-बारावी आणि विद्यापीठांच्या परीक्षा मात्र सुरू ठेवाव्यात आणि त्यासाठी खबरदारी घ्यावी असेही आदेश विभागाने राज्यातील शिक्षण विभागासोबत संबंधित विभागाला दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयात आणि त्यासोबतच आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था या 31 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात असे आदेशात म्हटले आहे.
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सोबतच विविध महाविद्यालयांच्या ही परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात यावेत असाही निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार या परीक्षा घेतल्या जाव्यात असे या आदेशात म्हटले आहे. मात्र या परीक्षा घेताना एखादा आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात याव्यात असे स्पष्ट म्हटले आहे. आरोग्य विभागाने हे आदेश कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ याचा आधार घेतला आहे.
त्या कायद्यानुसार खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई, - दि,१४ -कोरोना विषाणूच्या होणाऱ्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत. दहावी-बारावी आणि विद्यापीठांच्या परीक्षा मात्र सुरू ठेवाव्यात आणि त्यासाठी खबरदारी घ्यावी असेही आदेश विभागाने राज्यातील शिक्षण विभागासोबत संबंधित विभागाला दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयात आणि त्यासोबतच आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था या 31 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात असे आदेशात म्हटले आहे.
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सोबतच विविध महाविद्यालयांच्या ही परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात यावेत असाही निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार या परीक्षा घेतल्या जाव्यात असे या आदेशात म्हटले आहे. मात्र या परीक्षा घेताना एखादा आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात याव्यात असे स्पष्ट म्हटले आहे. आरोग्य विभागाने हे आदेश कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ याचा आधार घेतला आहे.
त्या कायद्यानुसार खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे.
No comments:
Post a Comment