मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात गेली होती.दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसून होती. येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये त्यांनी भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा प्यायला नंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली. दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.व यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं आणि तिचा खून केला.
महिलेचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मंदिर परिसतील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला.पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली, आरोपी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे, सदर घटनेतील आरोपीना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी.अशी मागणी यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणे व त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे या सरकारचे धोरण आहे. अशा परिस्थितीत सदरील घटना या स्त्रियांच्या मनोधैर्यावर विपरीत परीणाम करु शकतात. मंदिर परिसरात आरोपींनी एका विवाहीत महिलेवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना अत्यंत लाजीरवाणी व माणुसकिला काळीमा फासणारी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हंटले आहे. अशा घटना भविष्यात्त घडु नये याकरीता राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे येथे सीसीटीवी बसविण्यात यावे व तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी. धार्मिक स्थळामध्ये कार्यरत सर्व कर्मचारी, पुजारी व ईतर पूर्णवेळ सेवक यांची नजीकच्या पोलीस स्टेशन मार्फ़त चारित्र्य पडताळणी करण्यात यावी.तसेच महिलेचे आप्त व कुटुंबियाना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरविण्यात यावे. व सदर घटनेतील आरोपीना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी.अशी सूचना यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment