प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मनसे प्रमोद ( राजू ) पाटील यांनी गुरुवार 24 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू पाटील यांचे मोठे भाऊ रमेश पाटील, मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील, अरुण जांभळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.अर्ज भरल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत ते उमेदवार राजू पाटील यांचे सारथी बनले.यावेळी पत्रकारांशी बोलताना उमेदवार राजू पाटील म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा व लकी आहे.आजच्या दिवशी 2019 ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता.राज ठाकरे हे माझ्याबरोबर येथे आल्याने आनंदी वातावरण आहे.तर ठाणे येथून शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे तर महायुतीतून संजय केळकर यांना उमेदववारी जाहीर झाल्याबद्दल मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, हे दोन्ही उमेदवार मागच्या निवडणुकीत एकत्र होते आणि एकच गाडीतून फिरून माझ्या विरोधात प्रचार करत होते. आता ते दोन्ही उमेदवार माझ्या एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आहेत.तर पाच वर्ष मनसेने जे काम केले आहे. विविध विषयावरील आंदोलन, पाणी प्रश्न, कचरा प्रश्न अशी नागरी समस्या सोडविली आहेत.जनतेसमोर जाताना हि पाच वर्ष केलेली कामे घेऊन जाणार आहोत, जनतेची साथ मागणार आहोत, मते मागणार आहोत. पुढील पाच वर्ष शहरासाठी उत्तम काम करण्याचे आहे.मला खात्री आहे की जनता आमच्या सोबत उभी राहतील. कारण मागच्या काळात आघाडी व युती झाल्या ते जनतेने पाहिले आहे, जनतेच्या मनात आघाडी व युतीबद्दल प्रचंड नाराजी आहे. तिसरा पर्यंत म्हणून जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहत आहे. पुर्ण खात्रीने आम्ही विधानसभा निवडणुकीला समोर जावू आणि विजय मिळवू.
No comments:
Post a Comment