मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार दिला कोणी - ऍड. प्रकाश आंबेडकर - In India Live

Breaking News

27/04/2019

मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार दिला कोणी - ऍड. प्रकाश आंबेडकर

संघर्ष गांगुर्डे, इन इंडिया लाईव
भिवंडी  दि .२६  मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार दिला कुणी , मोदी डाकू आहे अशी खरमरीत टिका बहुजन वंचित आघाडीचे नेते तथा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी भिवंडीतील जाहीर सभेत केली . भिवंडी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी शहरातील टावरे स्टेडियम येथे वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते . याप्रसंगी ऍड प्रकाश आंबेडकर बोलत होते . या सभे दरम्यान एआयएमआयएम चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी , एमआयएम चे आमदार वारीस पठाण यांच्यासह शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघातील अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त केले . भिवंडीतील पाणी प्रश्न तसेच भिवंडीतील डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी काँग्रेस भाजपच्या खासदारांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत अशी खंत देखील बाळासाहेबांनी यावेळी व्यक्त केली . आपल्या भाषणाच्या मध्येच थांबून ऍड आंबेडकर यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट बाहेर काढण्याचे आवाहन केल व एका युवकाने आपल्या खिशातील दहा रुपयांची नोट काढली . त्यानंतर आंबेडकरांनी या नोटीवरचा मजकूर वाचण्यास सांगितले , नोटीवर असलेला भारताच्या गव्हर्नरांचा संदेश भर सभेत वाचला " मै धारक को दस रुपया अदा करने का वचन देता हु " हा गव्हर्नरांचा संदेश भर सभेत वाचल्या नंतर बाळासाहेबांनी प्रतिप्रश्न केला कि , " जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चालविल्या जातात , मग नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना दिला कोणी , मोदी डाकू आहेत, देशाचा पंतप्रधान लुटारू आहे " अशी खरमरीत टिका ऍड आंबेडकर यांनी याप्रसंगी करत मोदींच्या नोटबंदीचा चांगलाच समाचार घेतला.
यानंतर एआयएमआयएम अध्यक्ष यांनी अभिनेता अक्षय कुमार याने मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीची चांगलीच खिल्ली उडवली . तसेच सोलापूरच्या सभेत आपण ऍड बाळासाहेब आंबेडकरांना उचलून काँग्रेसवाल्यांना सांगून दिले की यापुढे आम्ही आमच्या खांद्यावर तुमचा बोजा उचलणार नाही यापुढे आपण वंचितांचे नेते ऍड प्रकाश आंबेडकरांना उचलले आहे असे स्पष्टीकर असदुउद्दीन ओवेसी त्यांनी आपल्या भाषणाप्रसंगी दिले . तर भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले मात्र भाजप अशा व्यक्तींवर कोणतीही कारवाई करत नाही , त्यामुळे अशा देशद्रोही प्रवृत्तीना महाराष्ट्राच्या नागरिकांनी हद्दपार केले पाहिजे असे आवाहन देखील ओवेसी यांनी या सभेप्रसंगी केले . तर भिवंडीच्या यंत्रमाग व्यवसायासाठी भाजप सरकारने कोणतेही प्रभावी धोरण बनवले नसल्यानेच आज भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आला आहे अशी प्रतिक्रिया देखील ओवेसी यांनी सभे प्रसंगी व्यक्त केली .

No comments:

Post a Comment